Notifications

राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

By PCB Author

November 30, 2018

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे राज्याच्या गृह खात्याची जबाबदारी आहे. त्यावरुन शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. २०१४ पासून पोलिंसावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे. असेच चित्र राहिल्यास राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, असा सवालही उपस्थित केला.