राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार हे लिहून ठेवा – चंद्रकांत पाटील

0
405

पुणे, दि.२३ (पीसीबी) –  राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार हे लिहून ठेवा, असे विधान  भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  केले आहे. पुन्हा सरकार येणार म्हणून संघटना बांधणीकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा भाजपचा काँग्रेस होईल, असेही  पाटील  म्हणाले.

भाजपच्या मेळाव्यात  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना  चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी  कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी  झपाटून कामाला लागण्याच्या सुचना केल्या. राज्यात भाजपचे संख्याबळ १०० च्या खाली येता कामा नये. यासाठी २ महिने जिद्दीने काम करा,  नुसते अहवाल खरडू नका, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना  सुनावले.

दरम्यान, भाजपमध्ये  बऱ्याच जणांना यायचे आहे. परंतु, आम्ही त्यांना तावूनसुलाखून मोजक्या लोकांनाच घेत आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राधाकृष्ण विखे यांना घेतले पण छगन भुजबळ यांना नाही. कारण विखेंवर कसलेही आरोप नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.