राज्यात कायद्याचा धाक उरलाय का नाही? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

0
546

बारामती, दि. २१ (पीसीबी) – रोडरोमिओंची हिंमत लेकींची अब्रु लुटण्यापर्यत गेली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय का नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्या बारामतीत बोलत होत्या.

हिंजवडी परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला होता. त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला आहे, ही घटना मनाला सुन्न करणारी आहे, असे त्या म्हणाल्या. याच् पार्श्वभूमीवऱ बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील धारेवर धरले आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.