Maharashtra

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असून आता तरी सरकार जागे होणार आहे का ?

By PCB Author

February 07, 2020

मुंबई, दि.७ (पीसीबी)  – राज्यात होणाऱ्या घटना संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पोलिसांचा धाक राहिल, अशा काही ठोस उपाययोजना कराव्यात अशी विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.परंतु त्याचा विचार होत नाही म्हणूनच पनवेलसारख्या ठिकाणी महिलेला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असल्याचे दरेकर यांनी गुरुवारी ते याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘पनवेल येथे गुरुवारी एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना भयंकर आहे. तर दुसरीकडे राज्यभरात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे आता तरी सरकार जागे होणार आहे का ? असा सवाल करत दरेकर केला.‘महाराष्ट्रात निर्माण झालेले गुन्हेगारी स्वरूपाचे चित्र, आपल्या राज्याला शोभणारे नाही,’ असे म्हणत त्यांनी या सर्व प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे मोर्चा काढत असतील तर त्यात इतर संघटनांच्या लोकांनी सहभागी होणे काय गैर आहे? असे देखील यांनी नमूद केले. ‘सरकारचा आणि पोलिसांचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उरला नाही. म्हणून हे लोक अशा प्रकारे रोज घटना घडवून आणत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला,’ असल्याची टीका दरेकर यांनी केली.