राज्यातील १०४१ ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान

0
739

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १०४१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त पदांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे, तर २७ सप्टेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी आज (गुरूवार) येथे दिली.