Maharashtra

राज्यातील महत्त्वाचे नेते भाजपसोबत आता लढायचे कोणासोबत हा प्रश्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By PCB Author

August 23, 2019

नंदुरबार, दि. २३ (पीसीबी) – राज्यातील महत्त्वाचे नेते भाजपसोबत येत आहेत. त्यामुळे आता कोणासोबत लढायचे? हा प्रश्न मला पडला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात काल धुळे येथून झाली. त्यांतर ते नंदुरबार येथील सभेत बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी आमच्या मेगा भरतीची चिंता करू नये, त्यांनी त्यांच्या महागळतीची काळजी करावी. तुमच्याकडे थांबायला कोणीही तयार नाही त्याचीच काळजी करा. १५ वर्षांत आघाडी सरकारला जे जमले नाही ते पाच वर्षांत आम्ही करून दाखवले आहे, असा दावा करत जलयुक्त शिवार योजनेद्वारे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.