Maharashtra

राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का?; सचिन सावंत यांची टीका

By PCB Author

November 12, 2019

मुंबई, दि.१२ (पीसीबी)- निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढला आहे. त्यातच आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्याती शक्यता व्यक्त होत आहे. परंतु ते सरकार स्थापन करण्यास यशस्वी न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हल्लाबोल करत राज्यपाल हे भाजपा चे बाहुले आहेत का? असा सवाल करत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

राज्यपाल हे भाजपा चे बाहुले आहेत का? सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटी शिफारस केली आहे हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल, असं म्हणत सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.