Maharashtra

राज्यपालांच्या वेळेच्या अटीमुळे सत्तास्थापन करणं अवघड- अजित पवार

By PCB Author

November 12, 2019

मुंबई,दि.१२ (पीसीबी) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्यास २४ तासांचा वेळ दिला आहे. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत सत्तास्थापन करण्यास सांगितलं आहे. मात्र इतक्या कमी वेळात सत्तास्थापन करणे अवघड असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.

स्थिर सरकार येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता असणे महत्त्वाचं आहे.काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आणि आम्ही इकडे त्यामुळे संवाद होत नाही. काँग्रेस सोबत आली तर मार्ग निघू शकेल, असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांनी सत्तास्थापनेपूर्वी अनेक कारणे पुढे केले आहेत. त्यामुळे आघाडी मध्ये बिघाडी होण्याची शक्यता दिसत आहे.