राजू शेट्टी सरकार वाचवण्यासाठी लुटूपुटूची लढाई करत आहेत – देवेंद्र फडणवीस

0
448

मुंबई,दि.१(पीसीबी) – राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्याची लुटूपुटूची लढाई केवळ सरकार वाचवण्यासाठी आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर दूध दरवाढ आंदोलनावर बोलताना केली आहे.

“या अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणाऱ्या दरात गाईच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे. राजू शेट्टी लुटूपुटूची लढाई करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ही फक्त सरकार वाचवण्यासाठीची लढाई आहे. राजू शेट्टी सरकारी आंदोलक झाले आहेत.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात याचे दावेही फेटाळले. बाळासाहेब थोरात यांची माहिती चुकीची आहे. देशात एक ग्रामही दुधाची भुकटी आयात झालेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.