सातारा, दि. १५ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रयत क्रांतीच्या ऊस परिषदेत ऊस दराबाबत सकारात्मक निर्णय जाहीर केला होता. मात्र, केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन सुरू केले आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभीमानी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांचे नांव न घेता केली.