राजस्थानमध्ये मंडप कोसळून १४ जण मृत्यूमुखी

0
420

बाडमेर, दि, २३ (पीसीबी) – राजस्थानमधील बाडमेर येथे रविवारी वादळी पावसामुळे अनेकांचे बळी गेले. जिल्ह्यातील एका गावात धार्मिक कार्य सुरू असताना वादळी पावसामुळे मंडप कोसळला. या अपघातात १४ जण मृत्युमुखी पडले तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या नहाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जसोल नावाच्या गावात ही दुर्घटना घडली. येथे रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमस्थळी अचानक वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला. मंडप कोसळला आणि वीज पुरवठा सुरु राहिल्याने लोकांचा शॉक लागून मृत्यू झाला. मात्र अद्याप अधिकृतरित्या या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.