Desh

राजकारणात हार-जीत चालते – सोनिया गांधी    

By PCB Author

August 09, 2018

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – राज्यसभा उपसभापतीच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह विजयी झाले आहेत. सिंह यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव केला. या पराभवाबद्द्ल काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारले असता राजकारणात हार-जीत चालतच असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिप्रसाद यांची निवड होईलष असे वाटले असावे. मात्रष ते शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी राजकारणात हार-जीत तर चालतच असते, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली. आणि त्यांनी तिथून निघून जाणे पसंत केले.

हरिवंश हे राजकारणात येण्याआधी पत्रकार होते. संपादक आणि लेखकही होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल. आता सगळ्याच खासदारांवर हरीकृपा राहिल असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. हरिवंश यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.