मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनींनी साबूदाणा खिचडी आणि वडा खाऊ घातला. जे पदार्थ त्यांनी खाऊ घातले त्यानंतर बोलायला काही जागाच उरली नव्हती, तेव्हाच दिलजमाई झाली, असे मिश्किल विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीवर केले.
मुख्यमंत्री मुंबईत एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख याने घेतलेली मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या यशस्वीपणे झालेल्या युतीबाबत मिश्कील विधान केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंसह सर्वांमध्ये जोरदार हशा पिकला.