सोलापूर, दि. २६ (पीसीबी) – रंगपंचमी दिवशी रंग खेळण्यासाठी बाहेर न जाऊ दिल्याच्या कारणावरुन एका १४ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार (दि.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास जाधववाडी ता. माढा, जि. सोलापूर येथे घडली.
यश दशरथ जाधव असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रंगपंचमी असल्या कारणाने यश आणि त्याचे वडिल दशरथ यांना सुट्टी होती. दशरथ यांनी यशला घरा बाहेर जाऊ नको घरातच अभ्यास कर असे सांगितले होते. यामुळे यश निराश होता. काही वेळाचे दशरथ हे लहान मुलगा ओम समवेत शेळ्या घेऊन चारण्यास गेले. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास यशने घरी गळफास घेतल्याचे काका बाळू जाधव यांना दिसले. त्यांनी त्वरीत यशला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.