Maharashtra

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू

By PCB Author

November 21, 2018

नाशिक, दि. २१ (पीसीबी) – येवला-मनमाड मार्गावर अनकाई बारी इथे भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन महिला, दोन पुरुष तसेच एका लहान मुलाचा समावेश आहे.

बुधवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून आयशर ट्रक आणि एर्टिगा कार यांची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. मृत्युमुखी पडलेले नगर जिल्ह्यातील रहिवाशी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की; कारचा समोरील भाग संपूर्ण चक्का चुर झाला आहे.