येरवडा कारागृहातून पाच कैदी पळाले

0
226

पुणे, दि. १६ (पीसीबी) – पुण्यातील येरवडा कारागृहातून मध्यरात्री पाच कैदी पळून गेले. कारागृहातील खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला. अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगन चव्हाण आणि सनी पिंटो अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. कारागृहातील इमारतीच्या चौथ्या बिल्डींग मधील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला. या कैद्यांमध्यव तिघेजण दौंड तालुक्यातील एक जण पुणे शहरातील आणि एक जण हवेली तालुक्यातील रहिवाशी आहेत. याप्रकरणी दौंड, वाकड, आणि हवेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.