युपी, बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ मध्ये जिंकू शकत नाही – राहुल गांधी

0
668

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ साली लोकसभेची निवडणूक जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आणि तशीच आघाडी बिहारमध्ये आकाराला आली तर भाजपाला १२० जागांवर फटका बसेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज (शुक्रवारी) लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले.