युपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ

0
561

भोपाळ, दि. १८ (पीसीबी) – मध्य प्रदेशातील नोकऱ्या  युपी-बिहारमधील लोक बळकावतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे,  असे मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यातील उद्योग व्यवसायात ७० टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर स्वाक्षरी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.