युती होण्यासाठी उध्दव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उचलला ; मा.गो.वैद्यांची टीका   

0
400

नागपूर, दि. २४ (पीसीबी) –  भाजप आणि शिवसेनेची युती होण्यासाठी  शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी  राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे, अशी टीका  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी वैद्य बोलत होते.  जानेवारी महिन्यापर्यंत सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल, असे वाटत नसल्याचे वैद्य यांनी यावेळी  म्हटले आहे.