युती झाली तरी बेहत्तर, रावसाहेब दानवेंना पाडणार म्हणजे पाडणार; अर्जुन खोतकरांचा निर्धार   

0
854

जालना, दि. १९ (पीसीबी) – युती झाली तरी बेहत्तर, पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असा निर्धार  शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी  व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे खोतकरांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही, तर रावसाहेब दानवेंचे काम करणार नाही, कोणत्याही परिस्थितीत खोतकरांना लोकसभा निवडणुकीत उतरवणारच, असा पवित्रा जालन्यातील शिवसैनिकांनी घेतला आहे.

शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरूंगामध्ये टाकणाऱ्या दानवेंच्या विरोधात खोतकरांना निवडणूक लढवू देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांना विनंती करणार आहे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना भाजपची युती झाली आहे. अशा परिस्थितीत खोतकर-दानवे  एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.