Maharashtra

युतीचा फॉर्मुला आधीच ठरलाय; कसलाही तिढा नाही- उद्धव ठाकरे

By PCB Author

September 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  ‘युतीचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रसंगी बोलताना उद्धव यांनी भाजप-शिवसेना युतीबाबतच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. ‘नाणारचे जे काही व्हायचे आहे, ते आधीच झालेले आहे. ‘आरे’बाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरूनच आहे. त्यामुळे युतीमध्ये गोंधळण्यासारखे काही नाही,’ असेही उद्धव म्हणाले.