युतीचा अंतिम निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे – रावसाहेब दानवे   

0
542

बुलडाणा, दि. २५ (पीसीबी) – आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांना बरोबर घेऊन  जाण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेना हा भाजप  नैसर्गिक मित्र आहे. गेल्या २५ वर्षांपासून आमची युती आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत यावे, ही आमची इच्छा आहे. मात्र, शेवटी निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.  

बुलडाणा जिल्हयातील चिखली येथे आज ( गुरूवारी) एका कार्यक्रमासाठी दानवे आले होते. यावेळी    ते  पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना सत्तेत राहून भाजपला  लक्ष्य करत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना व भाजप दोन्ही वेगळे पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाचा अजेंडा वेगवेगळा असतो. कोणाला लक्ष्य करून  पक्षाचा विस्तार होत असेल, असे जर त्यांना वाटत असेल. तर तो त्यांचा अधिकार आहे. भाजप  आपल्या अजेंड्यानुसार चालणार पक्ष आहे. आम्ही कोणत्याही टीकेमुळे विचलित  होणार नाही. पक्षाचे संघटनात्मक काम पुढे सुरूच राहिल, असे ते म्हणाले.