Maharashtra

…यासाठी मी तुरूंगातून बाहेर आलो आहे – छगन भुजबळ   

By PCB Author

November 26, 2018

नाशिक, दि. २६ (पीसीबी) – राज्यात सत्तांतर होऊन भाजप, शिवसेनेचे  सरकार सत्तेवर आले आहे. मला दोन वर्षांचा तुरूंगवास झाला. त्यानंतर मी आता तुरूंगाबाहेर आलो आहे. आता मी विकासकामांकडे लक्ष देणार आहे, त्यासाठी  मी तुरूंगाबाहेर आलो आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

मांजरापाडा येथे भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवण्यासाठी मांजरापाडा येथे प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी भुजबळ येथे आले असता त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना विकासकामे करण्यासाठी मी तुरूंगाबाहेर आलो आहे, असे भुजबळ म्हणाले. तुमची देखील मी कामे करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुजबळ यांचे आभार मानले.