भिवंडी, दि. १४ (पीसीबी) – भाजप सरकारच्या काळात देशात हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. मागील दाराने आणीबाणी आणली जात आहे. असहिष्णूतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका महत्त्वाच्या आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (सोमवार) येथे म्हटले आहे.