Maharashtra

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही – हितेंद्र ठाकूर

By PCB Author

October 22, 2019

विरार, दि. २२ (पीसीबी) – आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी   विरारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज (मंगळवार) केली. त्यांच्या या घोषणेनंतर  विरार परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

ठाकूर म्हणाले की, आता आपल्या जागी कार्यकर्ते तयार होतील. तसेच लोकांची साथ यापुढेही सोडणार नाही, तसेच आपण राजकारण सोडणार  नाही. आगामी काळात तालुक्याच्या विकासाची राहिलेली कामे पार पाडणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून वसई-विरार महानगरपालिकेतही त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे. तसेच यावर्षी वसई मतदारसंघातून हिंतेद्र ठाकूर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर नालासोपारा मतदारसंघातून आमदार क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या घोषणेपासून त्या ठिकाणी वातावरण कमालीचे तापले होते.