Maharashtra

यांना केवळ गाजरे दाखवण्याची कामे जमतात – अमोल कोल्हे

By PCB Author

August 07, 2019

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – शेतकऱ्यांना पिकविमा मिळत नाही. मात्र पिकविमा कंपन्या कोटीच्या कोटी रुपये कमवतात. इथे शेतकऱ्यांना विमा मिळत नाही आणि शिवसेना या जिव्हाळ्याच्या विषयावर राजकारण करत आहे. आंदोलन करण्याआधी सत्तेत मांडीला मांडी लावून कसे बसता याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं अहमदनगर शहरातून रॅली काढण्यात आली होती. यावेळी बोलत होते.

तसेच अहमदनगर शहराच्या विकासासाठी ३५० कोटी रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.ते पैसे मिळाले का?असेच गाजर कल्याण–डोंबिवलीकरांना दाखवले. साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी देणार होते.अजून एक दमडी सुद्धा मिळालेली नाही.यांना केवळ गाजरे दाखवण्याची कामे जमतात! अशी टीकाही त्यांनी केली