‘….म्हणून गूळ आणि चणे यांचं रोज थोड्या प्रमाणात सेवन करावं’

0
323

सगळ्यांनाच निरोगी आरोग्य हवं असत. मात्र, सध्याच्या बदलत्या काळात प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या फास्टफूडच्या चवीच्या आहारी गेल्यात. त्यामुळे तळलेलं तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. परिणामी, त्यातून अनेक शारीरिक आणि पुढे नकळतपणे मानसिक तक्रारी डोकं वर काढू लागतात. गुळ आणि चणे यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे या दोन्ही घटकांमुळे स्मरणशक्ती बळकट होते. शिवाय मेंदूची कार्य करण्याची क्षमतादेखील वाढते. त्यामुळे शरीरावर आणि मनावर येणारा ताण कमी होतो. परिणामी, मूड खराब असल्यास गुळ -चणे खावेत. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपला आहारदेखील तितकाच पौष्टिक आणि आरोग्यदायी असला पाहिजे.

१. गूळ-चण्याच्या नियमित सेवनाने हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.

२. गुळ-चणे मासिक पाळी दरम्यान खाल्यास त्रास कमी होतो.

३. गुळ आणि चणे खाण्याने शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यास मदत होते. ४. अकाली दात पडण्याची समस्या गूळ आणि चणे खाण्याने दूर होते.

५. शरीरातील लोह, रक्ताची आणि प्रथिनांची कमतरता गुळ-चणे खाण्याने भरून निघते.

६. जर केसगळतीमुळे आपण हैराण असाल तर गुळ-चणे खाल्ल्यामुळे केसगळती कमी होते.

७. गूळ चण्याच्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

८. थंडीच्या शिवाय इतर दिवसात गूळ आणि चण्याचे सेवन हे वजन वाढीसाठी फायदेशीर ठरते.