…म्हणून अमित शहा महिन्यातील तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार

0
862

कोलकाता, दि. ४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठीच अमित शहा प्रत्येक महिन्यातील तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार आहेत. याबाबतची माहिती अमित शहांनी एका मुलाखतीत बोलताना दिली.

यावेळी अमित शहा म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्रिपुरात भाजपचा विजय होईल, असे कुणालाही वाटत नव्हते. पण तिथे आम्ही जिंकलो. राज्यात मिस कॉलच्या माध्यमातून सदस्यसंख्या निर्माण करण्यासाठी मोहीम सुरु आहे. यासाठी आमचा पक्ष प्रत्येक बूथवर पोहोचत आहे. सर्व घटकांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ममता बॅनर्जी केवळ एका विशिष्ट घटकाचे राजकारण करत आहेत, असाही आरोप अमित शहांनी  यावेळी केला.

बंगालमधील लोक मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे भाजपला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. राज्यात आम्हाला नंबर एकचा पक्ष बनायचे आहे,’ अशी महत्त्वाकांक्षाही शहांनी यावेळी बोलून दाखवली.