मोदी सरकार असेपर्यंत कोणताही ‘पंजा’ तुम्हाला हात लावणार नाही – पंतप्रधान

0
514

नंदूरबार, दि. २२ (पीसीबी) –  मोदी सरकार  असेपर्यंत कोणताही ‘पंजा’तुम्हाला हात लावू शकणार नाही, असा इशारा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज (सोमवार) येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला  दिला. आदिवासी बांधवांसाठी पेन्शन योजना सुरू करणार , अशीही घोषणा यावेळी  मोदींनी केली.

महायुतीच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी  मोदींनी नंदुरबारमध्ये सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही घोटाळेबाज पक्ष आहेत.  मी सत्तेवर आहे तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.  काँग्रेस आणि इतर पक्ष तुमची थट्टा करीत आहेत. मध्यप्रदेशात आदिवासी विकास योजनांसाठी पाठवलेला निधीही या पक्षांनी खाल्ला. कुपोषणाची समस्या आपल्याला समूळ नष्ट करायची आहे. मात्र, काँग्रेसवाल्यांची नियत साफ नाही,  म्हणूनच त्यांचे राज्य असलेल्या मध्य प्रदेशातही ते या पैशांमध्येही भ्रष्टाचार करीत आहेत, अशी टीका काँग्रेसवर केली. या निवडणुकीनंतर देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. आदिवासी बांधवांना सन्मानाने कसे जगता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही मोदी  म्हणाले.