Notifications

मोदी सरकारमधील सर्व मंत्री दहशतीखाली; माजी मंत्री उपेंद्र कुशवाहांचा गौप्यस्फोट

By PCB Author

December 13, 2018

पुणे, दि. १३ (पीसीबी)  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य  दिलेले नाही. तर सर्व निर्णय पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून  (पीएमओ) घेतले जातात.  मोदी सरकारमधील सर्व मंत्री किती दहशतीखाली असतात, याचा मला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही अनुभव आला आहे, असा गौप्यस्फोट   माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी केला आहे.

पुण्यात आयोजित  पत्रकार परिषदेत कुशवाह बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते.