मोदी सरकारची उलटी गिनती सुरु – राज ठाकरे

0
795

मुंबई, दि. १० (पीसीबी) – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा हेच सांगून जातो, असे म्हटले आहे.

तर विजय मल्ल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता. मग त्याच्यावर पळून जाण्याची वेळ का आली? आणि नीरव मोदीबाबत केंद्र सरकार मिठाची गुळणी का धरून आहे ? असेही सवाल राज ठाकरे यांनी  उपस्थित केले आहेत.  विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याची बातमीही नुकतीच आली आहे, त्यावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.