नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. आता मोदींनी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यास केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दिलासा मिळणार आहे.