नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – राफेल करारप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही पंतप्रधान मोदी गप्प आहेत. ते भ्रष्टाचारी असून अनिल अंबानींचे चौकीदार आहेत. त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, असा आरोप करून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.