जयपूर, दि. ३ (पीसीबी) – पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध सुधारतील, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिध्दू यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला मी उपस्थिती लावल्यानंतर ही अपेक्षा आणखी मजबूत झाली आहे, असेही सिध्दू यांनी म्हटले आहे.