Notifications

मोदी दुसऱ्याला खाऊ घालतात आणि त्यात वाटा मागतात – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

October 02, 2018

औरंगाबाद, दि. २ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी हे अतिशय स्वच्छ कारभार करत असून त्यांनी कधीही पैसे खाल्लेले नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. हे खरे आहे, मोदी दुसऱ्याला खाऊ घालतात आणि त्यात वाटा मागतात, असा सडकून आरोप भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (मंगळवार) येथे केला.

औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर बहुजन वंचित आघाडीची सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.