इंदूर, दि. ११ (पीसीबी) – मोदीजी हे नवविवाहितेसारखे आहेत. जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून मोदी सरकारच्या काळातही हेच सुरू आहे, असे विधान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवज्योत सिंग सिद्धू आज ( शनिवारी) मध्य प्रदेशमधील इंदूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मोदी हे खोटे बोलणाऱ्यांचे प्रमुख आहेत. ते भारताचे विभाजन प्रमुख आहेत तसेच ते अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचे व्यवसाय व्यवस्थापकही आहेत, असा निशाणा त्यांनी साधला.
मोदीजी हे नवविवाहितेसारखे आहेत. जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करत आहे. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या काळातही हेच सुरु आहे. मोदी सरकार फक्त दिखावा करते आणि प्रत्यक्षात काम काहीच करत नाही, असे सिध्दू म्हणाले.