मोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे

0
649

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द काढल्याप्रकरणी निलंबित केलेले काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर यांचे निलंबन रद्द केले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान मणिशकंर अय्यर यांनी मोदीविषयी बोलताना ‘नीच प्रवृत्तीचा माणूस’ असे शब्द वापरले होते.  

काँग्रेसच्या अनुशासन समितीच्या सल्ल्यानंतर अय्यर यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, असे काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी सांगितले. काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एका व्यक्तीचे मोठे योगदान होते, त्यांचे नाव म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि अशा कुटुंबाबद्दल घाणेरडे वक्तव्य केली जातात, तेही डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला वाटते ही (नरेंद्र मोदी) व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहे. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही. अशा चांगल्या प्रसंगी घाणेरड्या राजकारणाची काय गरज आहे?, असे मणिशंकर अय्यर म्हटले होते.