मोदींनी सात जन्म घेतले तरी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी होणार नाही – बच्चू कडू

0
393

मुंबई,दि.१३(पीसीबी) – पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी करता येणार नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी मोदींना धारेवर धरलं आहे. बच्चू कडूंनी ट्वीट करत मोदींवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात वाद चांगलाच उफाळला आहे. भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मोदींना छ. शिवरायांसमान दर्जा देण्यात आला आहे. यावर आमदार बच्चू कडूंनी मोदींवर तोफ डागली आहे.

भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकावर विरोधकांसह अनेक स्तरातून आक्षेप घेण्यात आला आहे. मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने सर्वच स्तरांतून याचा निषेध केला जात आहे. सोशल मीडियावरही याचे तीव्र पडसाद उमटत असून शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, अशा प्रतिक्रिया येत आहे.