Desh

मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणत बॉलीवूड दिग्दर्शकाने त्यांच्याकडेच मागितलं कोरोना मृतदेह मोजायचं काम; पण का?

By PCB Author

May 04, 2021

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : देशात करोनाने उच्छाद मांडला असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यूची संख्या वाढत आहे. कित्येकांनी आपले जीव गमावले आहेत. अशातच बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अजब मागणी करत देशाच्या व्यवस्थेवर निशाणा साधत मोदींना खडेबोल सुनावलेत. भारतातील कोरोना परिस्थितीला राम गोपाळ वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाबाबदार मानत भारतातील कोरोनाच्या भयंकर परिस्थितीवरती संताप व्यक्त केला आहे.

SONIA GANDHI in 2014 said @narendramodi is MAUT ka SAUDAGAR ..I never knew that she is such a tremendously far sighted visionary and I profusely apologise to u madam Soniaj,and if possible please text ur feet so that I can digitally touch them 🙏🙏🙏

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 1, 2021

राम गोपाळ वर्मा ट्विट करत म्हणाले कि, ‘२०१४ साली सोनिया गांधी नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर म्हटल्या होत्या…! मला माहित नव्हतं की त्या एवढं चांगलं भविष्य सांगू शकतात. मी तुमची माफी मागतो सोनियाजी आणि जर शक्य असेल तर मला तुमच्या पायांचा फोटो पाठवा जेणेकरून मी तुमच्या चरणांना स्पर्श करून पाया पडू शकतो.’ राम यांनी ट्विट करत सोनिया गांधी यांनी मोदींबद्दल मांडलेलं मत त्यांना आता पटत असल्याची कबुली दिली.

Saar @narendramodi ji, Am supposedly a decent horror film maker, but I request u to give a spot boy job in ur upcoming horror film,THIRD WAVE ..I also can be just a clerk in the body counting department , because I love bodies as much as u,though for different reasons 🙏

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 1, 2021

शिवाय नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हणत करोनाच्या तिसऱ्या लाटेत मृतदेह मोजण्याचं काम वर्मा यांनी मागितलं आहे. राम यांनी ट्विट करत असंही म्हंटल आहे कि, ‘तसं तर मी एक साधा भयपट बनवणारा दिग्दर्शक आहे पण मला तुमच्या ‘करोनाची तिसरी लाट’ या चित्रपटात एका स्पॉट बॉयचं काम देण्याची विनंती करतो. किंवा मी फक्त एका कारकुनाची नोकरी करायलाही तयार आहे जो मृतदेह मोजायचं काम करेल. कारण मलाही तुमच्यासारखं मृतदेह बघायला आवडतात मग ते कोणत्याही कारणामुळे असुदे.’ असं म्हणत राम यांनी देशातील परिस्थितीसाठी पंतप्रधानांना जबाबदार ठरवत त्यांना देशातील परिस्थितीची जाणीव करून देत नागरिकांना सुद्धा जागे करण्याचं काम केलं आहे.