पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येला जाऊ नये – एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी

0
312

हैद्राबाद, दि. २९ (पीसीबी) – अयोध्येत ५ ऑगस्टला राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. दुसरीकडे मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आक्रमक झालेले दिसत आहे. ओवेसी यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून टीका केली आहे. अयोध्येचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला असला, तरी मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही,” असं म्हटलं आहे.

इंडिया टुडे वृत्तवाहिनीवर बोलताना एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या मुद्यावर भूमिका मांडली. “कायदेशीरदृष्ट्या सर्वात वर असलेल्या सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. परंतु, मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही. मी माझ्या कुटुंबाला, माझ्या लोकांना आणि भारतातील लोकांनाही, ज्या बहुसंख्य लोकांचा न्यायावर विश्वास आहे. त्यांना सांगेल की, तिथे एक मशीद होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी ती पाडली गेली. जर मशीद पाडली गेली नसती, तर हा कार्यक्रम (राम मंदिर भूमिपूजन) आयोजित करताच आला नसता,” अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.

“नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या गरिमेनुसार या कार्यक्रमाला उपस्थित राहु नये. कारण पंतप्रधान आणि सरकारला कोणताही धर्म असत नाही. केंद्र सरकारला धर्म आहे का? या देशाला कोणता धर्म आहे का? नाही. पंतप्रधानांनी देशाला सांगावं की, ते पंतप्रधान म्हणून अयोध्येला जात नाही आणि भूमिपूजन कार्यक्रमाचे कोणतेही थेट प्रक्षेपण केले जाऊ नये,” अशा शब्दात ओवसी यांनी मोदींवर निशाणा साधला.

ओवेसी यांनी ट्विट करूनही मोदींवर टीका केली होती. “पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संविधानाच्या शपथेच्या विरोधातील आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत बाबरी मशीद उभी होती. परंतु काही गुन्हेगारांच्या गटानं १९९२ मध्ये ती पाडली हे आम्ही विसरणार नाही,” असं ओवेसी म्हणाले होत