अकोला , दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभा केला आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून आपले नाव अजरामर राहण्यासाठी मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणत अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यास सांगितले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.