Notifications

मोदींच्यावरील रागामुळे भाजपचा तीन राज्यांमध्ये पराभव – राज ठाकरे

By PCB Author

December 22, 2018

नाशिक, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांच्यावरील रागामुळे  भाजपचा तीन राज्यांमध्ये  पराभव झाला आहे. विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात, असे सांगून लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचे धोरणच भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सध्याचे सरकार बेकार आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.