मोदींची हवा नसल्यानेच मोहिते, विखेंनी भाजप प्रवेश टाळला; नवाब मलिकांचा टोला

0
646

मुंबई, दि. १७  (पीसीबी) – देशात मोदींची सत्ता येत नाही याची शंका आल्यानेच विजयसिंह मोहिते-पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपामध्ये जाणे टाळले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आज अकलूज येथे मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर दिसले परंतू, त्यांनी भाजपा प्रवेश केला नाही. तीच परिस्थिती नगरच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांची आहे. या दोन्ही नेत्यांना आपल्या जागा निवडून येतील का? याबाबत विश्वास नाही असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

मोदींचं सरकार येत नाही म्हटल्यावर दोघांनीही आपली मुलं भाजपात पाठवली आणि स्वतः मात्र गेले नाहीत. दोघांनाही भाजपा पुन्हा सत्तेत येईल का? याबाबत शंका असल्याने त्यांनी अशी भूमिका घेतल्याचा टोलाही नवाब मलिक यांनी केला.