मुलीप्रमाणे मुलालाही तो काय करतोय, कुठे जातोय हे विचारण्याची गरज – अश्विनी जगताप

0
449

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मुलींच्या सुरक्षेसाठी आपण त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने घालतो. त्यांच्यावर संस्कार चांगले करतो. त्यांना खूप जपतो. परंतु, मुलींसारखेच आपण आपल्या मुलाकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. ज्या प्रकारे मुलींवर बंधने घालतो, त्याप्रकारे मुलांनाही आपण विचारले पाहिजे. तू कुठे जातो, मित्र कोण, काय करतो, हे विश्वासात घेऊन विचारल्यास चांगली पिढी निर्माण होईल आणि आपला भारत देश घडेल, असे प्रतिपादन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका आणि भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी सोमवारी (दि. २१) केले.