मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या – पंतप्रधान मोदी

0
431

श्रीनगर, दि. १४ (पीसीबी) – काश्मीरमधील मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. त्यांनी काश्मीरचे मोठ्या प्रमाणात शोषण केले आहे, अशी घणाघाती  टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

जम्मूतील कठुआ येथील एका जाहीर सभेत मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार हल्ला चढवला. अब्दुल्ला, मुफ्ती कुटुंबीयांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना मी देशाचे तुकडे करू देणार नाही. मी एका भिंतीसारखा त्यांच्यासमोर उभा राहीन, अशा शब्दात मोदींनी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सवर आणि  फुटीरतावाद्यांवर निशाणा साधला.

‘सर्जिकल स्ट्राइक , एअर स्ट्राइकचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. पण या हल्ल्यांमुळे विरोधकांच्या पोटात इतके का दुखतंय? त्यांना नक्की कोणाचं समर्थन मिळते आहे?’ असा सवालही त्यांनी केला.  काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काही घेणे-देणे नव्हते. भारतीय सैन्य त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग होता. सुरक्षा करारांमधून फक्त पैसे लाटण्याचे काम त्यांनी केला, असा आरोप मोदींनी यावेळी केला.