सोलापूर, दि. १६ (पीसीबी) – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने जाहीर केलेल्या डिजिटल गावाची सोमवारी (दि. १५) सोलापुरात झालेल्या सभेत पोलखोल केली. सरकारने अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव डिजिटल गाव म्हणून जाहीर केले आहे. त्यासाठीच्या जाहीरातीत काम केलेल्या तरुणाला राज ठाकरे यांनी मनसेच्या मंचावर आणले. हा तरूण आता नोकरीच्या शोधात फिरत आहे. मनसेने ही पोलखोल केल्यानंतर भाजपचे हरिसालमधील स्थानिक कार्यकर्ते त्या तरुणाला शोधत आहेत. झालं-गेलं विसरून जा, परत ये. आम्ही तुम्हाला मदत करतो, असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत असल्याचे राज ठाकरे यांनी सभेत सांगितले.
Home Notifications मुख्यमंत्र्यांनी मनसेची चड्डी काढण्याची भाषा केली; राज ठाकरेंनी सोलापूरच्या भर सभेत भाजपचीच...