Maharashtra

मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंगळवारी भाजप आमदार-खासदारांची तातडीची बैठक

By PCB Author

May 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणूकांच्या निकालाआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या आमदार-खासदारांची मंगळवारी (दि.२१) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणती चर्चा होणार याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. यामुळे बैठकीत कोणती चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.     

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूकीची रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे.  राज्यातील सर्व भाजप आमदार-खासदारांना  निकालाआधी  दोन दिवस मुंबईत बोलावून घेण्यात आले आहे. या बैठकीचे   निरोप सर्व भाजप आमदार खासदारांना  पोहच झाले  आहेत.

मंगळवारी सकाळी  १० ते दुपारी ४ पर्यंत  अशी सलग सहा तासांची ही बैठक होणार आहे. या बैठकीबाबत कोणतीच पूर्वसुचना देण्यात आलेली नाही. कशासाठी बैठक बोलवली, याची  काहीच  माहिती न देता बोलाविलेल्या बैठकीमुळे आमदार संभ्रमात आहेत.