Maharashtra

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

By PCB Author

August 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी १२ वाजता दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुढच्या दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा २६ ऑगस्टपासून पुन्हा ठरलेल्या कार्यक्रमानुसार सुरु होणार.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  अरूण जेटली यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे असे ते म्हणाले. मी अतिशय व्यथित आहे, तीव्र दु:खी आहे. अवघ्या एका पंधरवड्यात नियतीने आमचे दोन उमदे नेते हिरावून घेतले आहेत. अगदी काल-परवाच सुषमाजी आमच्यातून निघून गेल्या. असेही मुख्यमंत्री म्हणाले.