मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी ४० गोष्टी लिहिल्या आणि त्यातल्या ३८ पूर्णही केल्या – चंद्रकांत पाटील

0
645

मुंबई,दि.१६(पीसीबी) – मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी ४० गोष्टी लिहिल्या आणि त्यातल्या ३८ पूर्णही केल्या, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. एका माध्यमाला दिलेल्या ते मुलाखतीत बोलत होते.

शरद पवारांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी ४० गोष्टी लिहून काढल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात त्या पूर्ण केल्या. मला हे प्रमोद महाजन यांनी सांगितलं होतं, अस पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. या तीन टर्ममध्ये त्यांनी ४८ पैकी ३८ गोष्टी पूर्ण केल्या होत्या. असं त्यांच्याकडे व्हिजन होतं. असं व्हिजन उद्धव ठाकरे यांच्याकडं आहे का? हे पूर्ण व्हिजन अजित पवारांकडे आहे का?,’ असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

दरम्यान, मला माझा पक्ष आहे. त्यांना त्यांचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी मला रजिस्टर सावकारी आणि सावकारी यातील फरक सांगावा. हे तुम्हाला माहिती नसतं, तेव्हा तुमच्या डोक्यात अजेंडाच नसतो की सावकारी संपवायची आहे. असं डोकं अजित पवारांचं चालतं, असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत.