Maharashtra

मुख्यमंत्री साहेब सातबारा कोरा कधी करणार..? सरकारने उत्तर द्यावे

By PCB Author

February 25, 2020

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – विधानसभेचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराबाबत चर्चा करावी अशी मागणी फडणवीस यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, सातबारा कोरा कधी करणार, सरकारने उत्तर द्यावे, विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची मागणी केली आहे.

या दोन्ही विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र प्रश्नोत्तरांचा तास झाला पाहिजे , असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. फडणवीसांचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली.